मागील भांडणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मागील भांडणाच्या कारणावरुन दोन गटात तूंबळ हाणामारी झाल्याची घटना राजीव गांधी नगरात घडली. जखमीच्या डोक्यात खाली बियर बॉटल मारुन जखमी करण्यात आले असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील राजीव गांधी नगरात रहिम सिकंदर पठाण (वय-३५)कुटूंबीयांसह वास्तव्यास असून मजुरी करुन उदनिर्वाह करतात. २८ जून रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास, मागील भांडण उकरुन काढत रहिम पठाण यास फिरोज खान याने शिवीगाळ करुन चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडवण्यास आलेल्या रहिमच्या बहिणीला नादिरा शेख हिने पोटावर चावा घेतला तर, सद्दाम शेख याने खाली बियर बॉटल डोक्यात मारुन जखमी केले. जखमीवर रुग्णालयात उपचार केल्यानंतर पोलिसांनी नोंदवुन घेतलेल्या जबाबावरुन रामानंदनगर पोलिसांत तिघा संशयीतांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content