वीज बिल थकल्याने जामनेरची टेलिफोन सेवा बंद : ग्राहकांना मन:स्ताप

jamner

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील भारतीय संचार निगम लिमिटेडची सेवा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज तहसील कार्यालयात लेखी निवेदन देण्यात आले आहे.

नागरिकांना आपल्या पैसा असून देखील दैनंदिन कामासाठी लागणारा पैश्यांसाठी वणवण फिरावे लागत आहे. भारत संचार निगमची सेवा विजबील थकल्यामुळे 4 ते 5 दिवसांपासून विस्कळीत झाली असल्यामुळे तालुक्यातील बँकांसह जवळपास सर्वच शासकीय कार्यालयातील कामे खोळंबली आहेत. त्याचा निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीकडून आज तहसिलदार कार्यालयात निषेध नोंदवून लेखी निवेदन सादर करण्यात आली असून यावेळी संजय गरूड, तालूकाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर पाटील, प्रल्हाद बोरसे, नटवर चव्हाण, जितेश पाटील, विशाल पाटील, विनोद माळी, रवी बंडे व किशोर झाल्टे आदी उपस्थितीत होते. मात्र तालुक्यातील ऑनलाईन सेवा पुर्वत् सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांनी केलेले आंदोलन म्हणजे ”वराती मागून घोडे” असे दिसून आले.

Protected Content