‘वंचित बहुजन आघाडी’ ही भाजपची ‘बी टीम’ कधीच असू शकत नाही : चंद्रकांत पाटील

chandrakant patil

 

पुणे (वृत्तसंस्था) ‘वंचित बहुजन आघाडी’ ही भाजपची ‘बी टीम’ कधीच असू शकत नाही. कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी नेहमीच भाजपवर टीका केलेली आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

 

चंद्रकांत पाटलांनी पुण्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर काम करायला आम्हाला नक्कीच आवडेल. मात्र ते नेहमीच आमच्यापासून दूर राहिलेले आहेत. सामाजिकदृष्ट्या आम्ही एकत्र काम केले पाहिजे, असे माझे मत आहे. अकोला जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये अध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरु आहे. मात्र आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नसून सध्या आम्ही तटस्थ आहोत. प्रस्तावानंतर आम्ही नक्की विचार करु. प्रस्ताव काय येतो त्यावरुन निर्णय घेऊ, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Protected Content