वीजेच्या धक्का लागल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विजेच्या धक्का लागल्याने ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावात घडली आहे. याप्रकरणी रविवारी १६ जुलै रोजी सांयकाळी ५ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. संदीप रंगराव बागुल (वय-३६) रा. मंगरूळ ता. अमळनेर असे मृत तरूणाचे नाव आहे.

मिळालेली माहिती अशी की, संदीप रंगराव बागुल हा तरुण आपल्या परिवारासह अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे वास्तव्याला आहे. रविवारी १६ जुलै रोजी सकाळी घरी असताना त्याला विद्युत शॉक लागला व तिथेच बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याला खाजगी वाहनाने अंमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी यांनी घोषित केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन पाटील करीत आहे.

Protected Content