धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने वृध्दाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील कांचनगरात राहणाऱ्या एका ८५ वर्षीय वृध्दाचा धावत्यात रेल्वेखाली आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले आहे. यासंदर्भात शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अर्जुन भिवसन चौधरी (वय-८५)  रा. कांचन नगर, जळगाव असे मयत वृध्दाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अर्जून  चौधरी हे आपल्या पत्नी आणि चार मुलांसह वास्तव्याला होते. वृध्द असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून घरीच होते.  रोज पहाटे शतपावली करण्यासाठी जात होते. दरम्यान गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते.  दरम्यान जळगाव ते भादली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४२१ -२  जवळ एका धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजता उघडकीला आले.

परिसरात राहणाऱ्या नागरीकांनी त्यांची ओळख पटविली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना व नातेवंडे असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.

Protected Content