उध्दव ठाकरेंनी फडणविसांकडून ट्रेनिंग घ्यावे !

 

पटणा वृत्संस्था । उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे सर्वात अयशस्वी मुख्यमंत्री असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावे असा खोचक सल्ला बिहार भाजपचे प्रवक्ते निखील आनंद यांनी दिला आहे.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्राची देशात बदनामी झाली अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर आता भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे सर्वात अयशस्वी मुख्यमंत्री असून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्यावे असा खोचक सल्ला बिहार भाजपचे प्रवक्ते निखील आनंद यांनी दिला आहे. शिवसेनेनं आपलं नाव बदलून बाबर सेना करावं असं देखील म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतके खालच्या पातळीवर जाणारे राजकीय व्यक्ती असतील हे देशाच्या जनतेला माहीत नव्हतं. गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत बडबड करत आहेत आणि सोबतच मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका पक्षपाती कारवाई करत आहेत, ती थेट उद्धव ठाकरेंच्या निर्देशावरून आणि इशार्‍यावरूनच होत आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा आणि विचारधाराही पणाला लावली असल्याची टीका देखील आनंद यांनी केली आहे.

Protected Content