दोन अल्पवयीन मुलाला फूस लावून पळविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील इंदिरानगर राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील इंदिरानगर मानव संतोष पाटील (वय-११) आणि वैभव रवींद्र ठाकूर (वय-१३) हे दोन जण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता बाहेर जाऊन येतो असे सांगून दोघे घराबाहेर पडले. दरम्यान ते रात्री उशिरापर्यंत घरी आले नाही, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र दोघांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

दरम्यान दोघांच्या पालकांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार मंगळवारी १६ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे बाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. मनोरे हे करीत आहे.

Protected Content