किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी; पाच जण जखमी

जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीच्या डीपीचे ऑइल घेण्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण होवून तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. या मारहाणीत ५ जण जखमी झाले असून याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर शहरातील श्रीराम पेठ परिसरात महावितरण कंपनीच्या डीपीच्या ऑइलवरून रविवारी ९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता वाजता वाद निर्माण झाला. यामध्ये दोन गटात लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकमेकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत आशाबाई कैलास कोळी, जितेंद्र कैलास कोळी, शुभम संजय लोणारी, उषा संजय लोणारी, प्रमिला समाधान लोणारी असे एकूण ५ जण जखमी झाले. जखमींना जामनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत आशाबाई कैलास कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी तन्वीर मुनाफा शेख, समीर शेख लाला, लालू शेख सिराज शेख, रशीद खान, उजेब खान, सलीम रशीद, जावेद रशीद, आवेश शेख, आदिल शेख, निसार पटेल आणि फिरोज खान सर्व रा. श्रीराम पेठ, जामनेर यांच्या विरोधात रविवारी ९ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

Protected Content