दोन गटात जुन्या भांडणातून हाणामारी

धरणगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्‍यातील वराड गावात दोन गटात जुन्या भांडणातून हाणामारी झाली. या दोन्ही गटांनी एकमेकांवर कुऱ्हाडीने वार केल्याप्रकरणी दोन्ही गटातील तब्बल 19 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वराड गावातील तुषार भगवान पाटील व सोमनाथ भरत पाटील यांच्या गटात अनेक दिवसांपासून वाद आहेत. याच वादाची ठीणगी १३ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पडली. किरकोळ कारणावरून दोन्ही गट एकमेकांच्या समोर आले. यावेळी तुषार पाटील यांच्यावर टीकाराम पाटील, मुयर पाटील, राजु पाटील, सोमनाथ पाटील, सागर पाटील, प्रशांत पाटील, दीपक पाटील, दिनेश पाटील, सागर अशोक पाटील, नागराज पाटील, देविदास पाटील व मोरेश्वर पाटील यांनी हल्ला चढवला. प्रत्युत्तरात सोमनाथ पाटील यांच्या गटावर तुषार पाटील, किरण वाल्डे, भिकन पाटील, चेतन पाटील, रितेश पाटील, पंडीत पाटील व ज्ञानेश्वर पाटील यांनीही हल्ला केला. या दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या काठ्या, कुन्हाडीने वार केले. दोन्ही गटातील चार ते पाच जण गंभीर जखमी झाले होते. गावकऱ्यांनी हे भांडण सोडवून जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचार घेतल्यानंतर तुषार पाटील व सोमनाथ पाटील यांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्या. त्यानुसार दोन्ही गटातील १९ लोकावर दंगलीचा गुन्हा धरणगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ हिरालाल पाटील आणि पोहेकॉ अरुण निकुंभ हे करीत आहेत.

Protected Content