कोरोना हद्दपारीच्या मार्गावर; फक्त १५ नव्या रूग्णांसह आज जिल्ह्यात ११ तालुके निरंक

जळगाव प्रतिनिधी । कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात पहिल्यांदा १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर ६० बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाली आहे. विशेष म्हणजे आज अकरा तालुके निरंक असल्याचे दिसून आले आहे.

तालुका निहाय आकडेवारी

जळगाव शहर-५, जळगाव ग्रामीण-०, भुसावळ-०, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-०, भडगाव-१, धरणगाव-१, यावल-०, एरंडोल-०, जामनेर-०, रावेर-०, पारोळा-२, चाळीसगाव-६, मुक्ताईनगर-० आणि बोदवड-० असे एकुण १५ बाधित रूग्ण आढळून आले आहे

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या अहवालात आतापर्यंत १ लाख ४२ हजार ३०९ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३९ हजार ७५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजपर्यंत एकुण २ हजार ५७० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आज पहिल्यांदा ११ तालुका निंरक असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. 

Protected Content