गडचिरोलीत पावसाचा हाहाकार ; ३०० गावांचा संपर्क तुटला

0Rain 1

 

गडचिरोली (वृत्तसंस्था) गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मुख्य मार्ग बंद पडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 300 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला असून भामरागड शहरातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त घरे पाण्यात गेली आहेत. या संपूर्ण भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. भामरागड शहराला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आल्याने पाणी शहरात घुसलं आहे. या पुरामुळे शहरातील 50 टक्क्यांपेक्षा जास्त घरं पाण्यात गेली आहेत. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांनी हेलिकॉप्टरमधून येथील पूरपरिस्थितीची पाहणी केली आहे.

Protected Content