राहुलला कर्णधार बनवण्याची हीच वेळ – अनिल कुंबळे

KL Rahul

नवी दिल्ली वृत्तसंस्था । ‘आम्हाला राहुलच्या अंगावर जबाबदारी द्यायची होती. त्याने जबाबदारी घेण्याची हीच योग्य वेळ आहे आणि आम्हाला एका भारतीय कर्णधाराभोवती संपूर्ण संघ मजबूत तयार करायचा होता, त्यामुळे राहुलशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे त्याची कर्णधार पदासाठी निवड करण्यात आल्याचे कारण अनिल कुंबळे यांनी सांगितले आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

किंग्स इलेव्हन पंजाबने कर्णधार रविचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्स संघाकडे सोपवले आहे. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. सर्वांची अपेक्षा होती की, सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला टीम इंडियाचा सलामीवीर लोकेश राहुल याच्याकडे पंजाबच्या संघाची धुरा सोपवावी. त्याप्रमाणे कर्णधारपदाची माळ राहुलच्या गळ्यात पडली आहे.

राहुल एक चांगला फलंदाज आहे. त्याचं यष्टीरक्षणही खुप सुधारले आहे. त्याचे संघात वजन वाढलेय. त्याच्या शब्दाला किंमत आहे. तसेच उद्योन्मुख खेळाडूंसाठी तेा रोल मॉडेल ठरेल. आयपीएलच्या मागील पर्वात तो पंजाबचा सर्वोत्तम फलंदाज ठरला होता. पंजाबकडून सर्वाधिक धावा त्यानेच केल्या होत्या. तसेच भारतीय संघासाठी खेळतांना त्याने 2019 चे वर्षे गाजवले आहे. तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे आयपीएलच्या आगामी मोसमात तो चांगली कामगिरी करु शकेल. असे मत अनिल कुंबळे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले आहे.

Protected Content