…हे तर दारू विकणार्‍यांचे सरकार : फडणविसांचा हल्लाबोल

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे सर्वसामान्यांचे नसून दारू विकणार्‍यांचे आहे. यामुळे लोकांना दिलासा देण्याऐवजी दारूच्या किंमती कमी केल्या असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला.

देवेंद्र फडणवीस यांनी लाखाणी येथील प्रचार सभेत बोलतांना राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, हे सरकार सामान्य माणसांचं नाही. सामान्य माणसाच्या विरोधातील हे सरकार आहे. या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता असं सांगतानाच हे सरकार हरवलं असून शोधून देणार्‍यास पुरस्कार देऊ. आम्ही ५ वर्षात एकाही शेतकर्‍यांची वीज कापली नाही. मात्र या सरकारच्या काळात रोज वीज कापली जात आहे. एका डीपीवर ४ शेतकर्‍यांनी वीज भरली नाही तर पूर्ण डीपी काढून नेण्याचे काम केले गेले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

फडणवीस पुढे म्हणाले की, कोरोनाच्या काळात या सरकारने जराही मदत केली नाही. बार मालक शरद पवारांकडे गेले. तिथे गेल्यावर त्यांनी लायसन्स फी कमी करून घेतली. विदेशी दारुवर ५० टक्के कर माफ करून घेतला. विदेशी दारु स्वत झाली. हे दीन दलित, गरीबांचे सरकार नसून दारु विकणार्‍यांचे सरकार आहे. तर, ओबीसी आरक्षण रद्द करण्याचे पाप या सरकारने केलं आहे. ओबीसी आरक्षण रद्द केल्याने ओबीसींचं राजकीय प्रतिनिधीत्वच धोक्यात आलं आहे. या सरकारने इम्पिरिकल डेटा वेळीच जमा केला असतास तर आज ही वेळ आली नसती, असंही ते म्हणाले.

Protected Content