रावेर शहरात चोरट्यांचा धुमाकूळ : नागरिक भयभीत

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  शहरात तीन ठिकाणी झालेल्या  घरफोड्यांमध्ये २१ ग्रॅम सोने,चाळीस भार चांदी तर ७२ हजार रोख वेग-वेगळ्या घटनांमधुन चोरीला गेले आहे.यामुळे एकच खळबळ उडाली आहे.यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावण निर्माण झाले असून यामुळे रावेर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.

या बाबत वृत्त असे की रावेर शहरात वेग-वेगळ्या भागात घरफोड्या झाल्या आहे.तर काही ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रर्यत्न झाला आहे.ही सर्व घटना रावेर शहरात रात्री लाईट नसतांना झाल्या आहे.सौभाग्य नगर येथील रहीवासी असलेले प्रशांत पाटील कामा निमित्त नाशिक गेले असता.अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटा मधुन २१ ग्रॅम सोन्याचे दागीने तर १७ भार चांदी तर २७ हजार रोख चोरीला गेले.

दरम्यान, दुसरी घटना देखील सौभाग्य नगर मध्येच झाली आहे.येथील अशोक प्रेमसिंग पाटील हे त्यांच्या मूळ गावी पाचोरा येथे गेले असतांना त्यांच्या घराचा देखिल कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यानी ४५ हजार रोख चोरुन नेले आहे.घरमालक प्रशांत पाटील यांच्या फिर्यादी वरुन रावेर पोलिस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच तिसरी घटना जिआय कॉलनी येथे घडली असून श्रीमती अटकाळे यांचे देखील बंद घर फोडण्यात आले आहे. त्या बाहेरगावी असल्याने त्यांच्या कडे किती रुपयांचा ऐवज गेला अद्याप कळलेला नाही.

या घडलेल्या घटनांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अन्नपूर्णा सिंग, प्रभारी अधिकारी सतीष अडसुर यांनी घरफोडी केलेल्या ठिकाणची पाहणी केली. पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी आता करण्यात येत आहे.

Protected Content