जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जून्या वादातून राजमालती नगरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी दोन गटांवर परस्परविरोधा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजमालती नगरात जास्मीन राजू पटेल या वास्तव्यास असून त्याच परिसरातील विक्की दीपक माने व भुषण पंडीत रांजन यांच्यासोबत जून्या वादाच्या कारणावरुन त्यांचे भांडण झाले. या भांडणात दोघ तरुणांनी महिलेला शिवीगाळ करीत तुला उडवून टाकेल अशी धमकी दिली. तर दुसऱ्या गटातील विकी माने याने दिलेल्या तक्रारीवरुन यास्मीन राजू पटेल व संजू बिस्मिल्ला पटेल यांनी त्याला जून्या वादातून शिवीगाळ करीत धमकी दिली. दोघांनी दिलेल्या तक्रारीवरुन दोन्ही गटातील चार जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय बडगुजर हे करीत आहे.