टागोर नगरातील विवाहितेचा छळ

जळगाव प्रतिनिधी । शहरातील टागोरनगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणार्‍या पतीसह सासरच्यांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील टागोरनगरातील माहेर असलेली ज्योती राहूल खरे (वय ३०) यांचे महाबळ परिसरातील समता नगरातील राहूल खरे यांच्यासोबत २५ मे २०११ रोजी विवाह झाला आहे. लग्नानंतर  १० ऑगस्ट २०२१ पर्यंत पती राहूल भिका खरे यांच्या सासरकडच्या मंडळींनी वेळोवेळी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आला. त्रास असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या होत्या.

याप्रकरणी त्यांनी शुक्रवारी जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन पती राहूल भिका खरे, सासरे भिका भावडू खरे, सासू चंद्रकला भिका खरे, नणंद लता भागवत साळवे सर्व रा. समतानगर,  मनिषा संतोष साळवे रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढीत तपास प्रदिप पाटील हे करीत आहे.

 

Protected Content