धक्कादायक : चार मुलांच्या आईने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून


आग्रा (वृत्तसंस्था) चार मुलांच्या आई असलेल्या एका विवाहितेन प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलीय.

 

आग्रातील सिकंदरा भागातील राधानगरमध्ये राहणारा कामगार 36 वर्षांचा हरिओम सिंह हा राजवीर चेन फॅक्टरीत नोकरी करत होता. 17 वर्षांपूर्वी त्याचा विवाह बबली सिंह हिच्याशी झाला होता. त्यांना ज्योती, राशी, नमन आणि गुड्डू अशी चार मुले आहेत. बबलीचा प्रियकर असलेला आरोपी करण हा साडीच्या दुकानात काम करत होता. फेब्रुवारी महिन्यात दोघांची ओळख झाली होती. हरिओमलाही या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली होती. त्याने बबलीला विरोध केला, पण तिने काहीएक ऐकले नाही. यानंतर हरिओम सिंह तीन नोव्हेंबरपासून अचानक बेपत्ता झाला. पत्नी बबली आणि तिचा प्रियकर कमल यांनीच हरिओमची हत्या केल्याचा संशय सुरुवातीपासून पोलिसांना होता. अखेर प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातून दोघांनी हरिओमचा जीव घेतल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर बबली आणि कमल यांनी मृतदेह पेटीत भरुन जवाहर पुलावरुन यमुना नदीत फेकून पळ काढला होता. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून मृतदेहाचा शोध सुरु आहे.

Protected Content