नाल्यात वाहून गेलेल्या ‘त्या’ मुलीची ओळख पटली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणारी १४ वर्षीय मुलगी नाल्याच्या पाण्यात पाय घसरून पडल्याने नाल्यात वाहून गेल्याची घटना आज दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

गायत्री सुरेश मिस्तरी (वय-१४ ) रा. कोळ न्हावी ता. यावल ह.मु.हरीविठ्ठल नगर जळगाव. असे मयत मुलीचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, गायत्री मिस्तरी ही अल्पवयीन मुलगी वडील सुरेश शामराव मिस्तरी आणि आई सिमाबाई मिस्तरी यांच्यासह लहान बहिण सोनू सोबत राहते. आज बुधवार १७ ऑगस्ट रोजी सकाळी वडील सुरेश मिस्तरी हे अयोध्या नगरात कामावर निघून गेले. आई सिमाबाई घरात होत्या. सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गायत्री कोणालीही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या. आरएमएस कॉलनीजवळ रामानंदनगरातून येणाऱ्या रस्त्यावरील लागणाऱ्या नाल्याजवळ गायत्री उभी होती. पाय घसरल्याने ती वाहत्या नाल्याच्या पाण्यात पडली. हा प्रकार काही तरूणांच्या लक्षात आला. पण काही करण्याच्या आता गायत्री पाण्यात बेपत्ता झाली. याबाबत रामानंदनगर पोलीस कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शोधाशोध करत असतांना दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास त्या मुलीचा मृतदेह खंडेराव नगरातील नाल्याजवळ आढळून आला. सुरूवातील अनोळखी म्हणून पोलीसांनी मृतदेह  जिल्हा रूग्णालयात रवाना केला. गायत्रीच्या गल्लीतील काही तरूणांना लक्षात आली. गायत्रीचे वडील यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली व ओळख पटली. गायत्रीच्या पश्चात आई वडील, मनिषा, माधुरी, सरला, दुर्गा आणि सोनू अश्या पाच बहिणी असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Protected Content