लोकनेत्यांच्या पराभवाचा डाव फडणवीसांच्या बंगल्यावरच रचला गेला : अनिल गोटे

anil gote

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या लोकनेत्यांना पराभूत करण्याचा कट वर्षा बंगल्यावरच रचण्यात आला होता असा आरोप भाजपचे माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. दरम्यान, अनिल गोटे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

 

गोटे यांनी म्हटलेय की, वर्षा बंगल्यावर नेहमीच 10 वाजता त्यांच्या बैठका व्हायच्या. त्याचाच मी पण बळी ठरलो. याच कटकारस्थानांना कंटाळून मी भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्षा निवासस्थान प्रत्यक्षात नाइट क्लब गँग होती. याच ठिकाणी षडयंत्र रचले जात होते. भाजपची राज्यात सत्ता असताना मंत्री राहिलेले गिरीश महाजन यांच्यासह इतर नेते येथे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेण्यासाठी येत होते. त्याच भेटींमध्ये लोकनेत्यांना पराभूत करण्याचे डाव रचले जात होते. फडणवीस यांच्या वर्षा गँगने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांच्यासह महत्वाच्या नेत्यांना बाजूला सारले. तसेच गँगचे मेंबर असलेल्या गिरीश महाजन, जयकुमार रावल, प्रसाद लाड, प्रविण दरेकर, राम कदम आणि इतरांना मोठे केले गेले.

Protected Content