पती-पत्नीचा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेहुण्याला जावयांने संपवले

वाशिम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वाशिम जिल्हयात कौटूंबिक वादामुळे खून झाल्याची घटना घडली आहे. पतीच्या सतत त्रासाला कंटाळल्यामुळे पत्नीने घर सोडून माहेरी गाठले होते. पत्नीने माहेरी आपल्या घरी यावे असा पतीचा आग्रह होता. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेहण्यावर जावयाने जीवघेणा हल्ला केला असता उपचारादरम्यान मेहूण्याचा मृत्यू झाला आहे. नारायण सांडे हे मृत मेहुण्याचे नाव आहे. तर विजय खेकाळे हे हल्लाखोर जावईचे नाव आहे. मालेगाव तालुक्याच्या वाघी गावातील जावाई विजय खेकाळे हा नेहमी आपल्या पत्नीला दारू पिऊन त्रास देत होता. याच कारणाने पत्नी माहेरी निघून गेल्यानंतर विजय यांनी फोन करुन पत्नीच्या भावाला धमकी दिली. बायकोचा भाऊ म्हणजेच मेव्हणा असलेल्या नारायण सांडे याला विजयने फोन करुन धमकी दिली होती.

पत्नीला घरी पाठवत नाही, या कारणावरून मेहुण्या आणि जावयांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्याने पत्नीच्या सासरी आणि मेहूण्याला धमकी ही दिली होती. विजय खेकाळे यांची पत्नी माहेरी गेल्यामुळे त्यांचा मेहूणा नारायण सांडे हा जावयाला समजवण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. पण त्यांच्याशीच वाद घालत विजयने नारायणवर कुऱ्हाडी वार करत त्याला जखमी केले. ही घटना १ मे रोजी वाघी या गावात घडली. यानंतर जखमी मेहुणा नारायण सांडे याला नागपूर येथील रूग्णालयात दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १ मे रोजी आरोपी जावई विजय खेकाळे यास अटक केली होती. या घटनेनंतर शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content