राजू शेट्टींनी केली महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा

कोल्हापूर लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारिणीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

यावेळी संवाद साधतांना, “निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ उभी केली नसून चळवळ टिकवी म्हणून आपण निवडणूकीचा मार्ग स्वीकारत असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही असं म्हणत ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले याविषयी त्यानी अशी नाराजी व्यक्त केली.

Protected Content