तर हिरेन प्रकरणाची पुनरावृत्ती – सोमय्या

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |महाविकास आघाडीतील शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांचेवर इडीने छापा टाकला, तसेच त्यांना दापोलीतील जमीन विकणाऱ्या कोथरुडच्या विभास साठेच्या कार्यालयात देखील ईडीने छापा टाकला, यावरून साठेंसंदर्भात हिरेन प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ शकते, अशी भीती सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.

तीन दिवसापूर्वीच महाविकास आघाडीतील शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब  रिसॉर्ट घोटाळा प्रकरणी मुंबईसह पुणे आणि रत्नागिरी अशा एकूण सात ठिकाणी छापे टाकले.  मंत्री परब यांनी २०१७ मध्ये विभास साठे यांच्याकडून दापोली येथील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील जमीन घेतली व फसवणूक करत रिसॉर्ट बांधला, त्यानुसार अनिल परब यांना दापोलीमधील जमीन विकणाऱ्या विभास साठेंच्या कोथरुडमधील घरावरही छापा टाकण्यात आला होता. या घोटाळ्यासंबंधी तपास यंत्रणा, संस्थांनी तसंच पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी अनिल परब आणि त्यांच्या साई रिसॉर्ट एनएक्सवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्यानुसार अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्ट घोटाळ्याची चौकशी सुरु आहे.

दरम्यान, अनिल परब या घोटाळ्यामुळे अडचणीत आले असून बंद रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात कसे जाईल व त्यागोष्टीचा पैशांच्या गैरव्यवहाराशी काय संबंध, असा सवाल करत परब यांनी ईडीच्या कारवाईला हास्यस्पद ठरवले होते. परब हे विभास साठेंवर दडपण आणण्याची शक्यता आहे. विभास साठे यांच्या जिवाला धोका असून साठे यांचा ‘मनसुख हिरेन’ होऊ नये, असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे. तसेच त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था महाराष्ट्र पोलिसांनी करावी, अशी विनंती मी महासंचालक यांना केली असल्याचं सांगत सोबत पत्र शेअर केलं आहे.

आता सक्तवसुली संचालनालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय, परिवहनमंत्री अनिल परब यांच्या मालमत्तांवर छापे टाकल़े. ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीच्या ११ सदनिकांवर जप्तीच्या कारवाईपाठोपाठ मनपा सभापती यशवंत जाधव यांना चौकशीसाठी पाचारण करण्यात आलेले असताना परब यांच्यावरील या कारवाईमुळे तपास यंत्रणा ‘मातोश्री’ पर्यंत आल्याचे बोलले जात आहे आणि म्हणूनच पुन्हा साठेंसंदर्भात हिरेन प्रकरणाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.

Protected Content