ठाकरे यांना ‘जनाब’ संबोधल्यावर शिवसेनेचे फडणवीसांना प्रत्युत्तर

मुंबई – लाइव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यांना शिवसेनेने आता हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे असं नाव स्वीकारलेलं आहे अशीवर टीका केली होती. “चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही; मग आताच ‘जनाब’ या शब्दाबद्दल एवढा राग का ?” अशा शब्दात शिवसेनेकडून प्रत्युत्तर देत प्रतिप्रश्न करण्यात आला आहे.

“तेव्हा चादर चढवताना आपला स्वाभिमान झुकला नाही का?” मग आताच जनाब या शब्दाबद्दल एवढा राग? असा सवाल शिवसेनेने केला आहे

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिल्याने चर्चेला उधाण आलं होतं. मात्र एमआयएमने महाविकास आघाडीबरोबर आघाडी करण्याची योजना मांडली असली तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे.

याच पार्श्वभूमीवर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्विकारलेलं आहे असे म्हणत शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर आता शिवसेनेकडून प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या चादर चढवितांनाचा फोटो ट्वीट करत प्रत्युत्तर दिले असून आताच जनाब या शब्दाबद्दल एवढा राग? का असा प्रतिप्रश्न केला आहे.

“जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,” असे टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.

Protected Content