शेख अजगर यांच्या मृत्यूची चौकशी सीआयडीने करावी;बहुजन मुक्ती पक्षाची

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शेख अजगर शेख अकबर यांचा मृत्यू होऊन एक महिना उलटल्यावर सुद्धा अदयाप पोलिसांना कुठलाही धागा दोरा सापडलेला नाही. शेख अजगर शेख अकबर हे मुक्ताईनगर मध्ये त्यांच्या दोन मुले आणि आई-वडिलांसह वास्तव्यास होते तसेच गेल्या चार-पाच महिन्यापासून पंचायत समितीमध्ये महिला व बाल संगोपन विभागात कंत्राटी बेसवर नोकरी करून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे १ मार्च रोजी शेख असगर हे आपली गाडी व बॅग घेऊन कामावर जातो असे घरी सांगून गेले परंतु शेख असगर कामावर पोहोचलेच नाही किंवा त्यांचा कुणाशीही संपर्क झाला नाही किंवा दिवसभरात ते कुणालाही भेटले दिसले सुद्धा नाही.

२ मार्च रोजी त्यांचा मृतदेह आणि त्यांची मोटरसायकल कुऱ्हा रोडवरील डोलारखेड गावाजवळ सकाळी सुमारे साडेपाच वाजता प्रथमता रस्त्याने जाणाऱ्यांना दिसले लागलीच त्यांनी त्यांचे फोटो व्हॉट्सअप द्वारे ग्रुप वर टाकले. त्यामुळे या प्रकरणाची माहिती त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचली घटनास्थळ पाहता त्या ठिकाणी कुठलेही अपघात झाल्याचे दिसत नाही. त्यांच्या गाडीचे कुठेही नुकसान सुद्धा झालेले नाही म्हणून हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्याने त्यांचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव या ठिकाणी पाठवण्यात आलेला होता.

सदर घटनेत जर अपघात झालेला असेल तर मृताच्या गाडीचे कुठेही नुकसान का नाही किंवा मयताचे अंगावर सुद्धा इतरत्र कुठेही मार लागल्याच् आढळलेले नाही. जर अपघात झाला असेल तर त्यांनी घरून सोबत नेलेली त्यांची ऑफिस बॅग सुद्धा त्याच ठिकाणी मिळायला हवी होती. परंतु अद्याप पर्यंत त्यांची बॅग सुद्धा मिळून आलेली नाही आणि त्यांचा मोबाईल सुद्धा त्यांच्या घरी त्यांच्याच खिशामध्ये मिळून येणे मग ते कामावर जात असताना किंवा कोणीही व्यक्ती घराच्या बाहेर पडत असताना मोबाईल हा सोबत घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. शेख असगर यांचे बहुतांश काम हे मोबाईल वरून लोकांची कागदपत्रे ऑनलाईन करत असत, त्यामुळे त्यांचा मोबाईल घरी विसरणे शक्य नाही. शेख असगर यांचा मृतदेह ज्या परिसरात मिळून आलेला आहे. त्या ठिकाणी ते का गेले असावे त्यांचा अपघातच झालेला आहे किंवा घातपात झालेला आहे, हे अद्याप पोलिसांकडून स्पष्टपणे माहिती मिळू शकलेली नाही. तरी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी होऊन मृताच्या नातेवाईकांना न्याय मिळावा या विषयाचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देतेवेळी शेख अकबर शेख याकूब, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष इरफान बागवान, जाकिर शेख जाबिर, इमरान पटेल, मन्यार बिरदरीचे जिल्हाध्यक्ष हकीम चौधरी, शेख कलीम मन्यार अहमद मन्यार, ठेकेदार आती खान, शिवसेनेचे महाराष्ट्र अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अफसर खान, अरमान शेख कादर, आमिर खान, एजाज शेख, बुडन ठेकेदार, शब्बीर शेख शकूर, भारत मुक्ती मोर्चाचे विभागीय अध्यक्ष नितीन गाढे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content