शेवटच्या श्‍वासापर्यंत शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष ! : आ. अनिल पाटील

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शरद पवार यांनी जाहीर केलेला पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रतोद आमदार अनिल भाईदास पाटील यांनी घेतली आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. प्रामुख्याने राष्ट्रवादीत तर यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. एकीकडे मुंबईत पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा राजीनामा मागे घ्यावा अशी मागणी केली असतांना राज्यभरात याचे पडसाद उमटू लागले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोद तथा अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी या निर्णयावर भाष्य केले आहे. या संदर्भात ते म्हणाले की, पवार साहेबांनी आपला निर्णय मागे घ्यावा ! पवार साहेब हे त्यांच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत पक्षाचे अध्यक्ष राहतील. यामुळे त्यांना त्यांचा निर्णय बदलावा यासाठी मत परिवर्तन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असेही ते म्हणाले.

Protected Content