भोसरी भूखंड प्रकरणात तत्कालीन उपनिबंधकाला दोन दिवसांची कोठडी

मुंबई प्रतिनिधी | प्रचंड गाजत असलेल्या भोसरी भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या पाठोपाठ या व्यवहारात महत्वाची भूमिका असणारे तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील अटक करण्यात आली आहे. पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर याच प्रकरणात सर्व संशयितांना प्रोसेस इश्यू करण्यात आले असून ईडीने अजून समन्स बजावण्यासाठी कोर्टाकडून मुदत वाढवून मागितली आहे.

याबाबत वृत्त असे की, भोसरी येथील वादग्रस्त भूखंड खरेदी प्रकरणी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर गेल्या वर्षी सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह इतरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी ईडीने दोनदा एकनाथराव खडसे यांची चौकशी केली आहे. तर ५ जुलै रोजी त्यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. काही दिवसांपूर्वीत या प्रकरणात एकनाथराव खडसे, मंदाताई खडसे, गिरीश दयाराम चौधरी आणि तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल करण्यात आलेले आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकतात.

दरम्यान, याच प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना देखील आता अटक करण्यात आली आहे. www.livetrends.news मुळे यांनी भोसरी येथील जमिनीचे बाजारमूल्य हे २३ कोटी रूपये असतांना खडसे यांच्या आप्तांसाठी याचे मूल्य २.७ कोटी रूपये इतके केले. यातून गैरव्यवहार झाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. तर एकनाथराव खडसे यांनी या सौद्यात आपल्याकडील ५० लाख रूपये मंदाताई खडसे यांच्या खात्यामध्ये वळविले आहेत. यात १५ लाख रूपये रोकडच्या स्वरूपात भरण्यात आले होते. यातील ३८ लाख रूपये भोसरी येथील भूखंडाची खरेदी करण्यात आल्याचे ईडीने आपल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.

या पार्श्‍वभूमिवर, ईडीने भोसरी भूखंड खरेदी प्रकरणात तत्कालीन उपनिबंधक रवींद्र मुळे यांना अटक केली आहे. www.livetrends.news सोमवारी पीएमएलएच्या विशेष न्यायालयाने मुळेंना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रसंगी मुळे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी ते चौकशीत सहकार्य करत असून या प्रकरणातील मुख्य संशयित नसल्याने त्यांना अटक करू नये असा युक्तीवाद केला. मात्र न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची कोठडी दिली आहे.

तर याच सुनावणीत ईडीने खडसे कुटुंबाला चौकशी करण्याच्या हेतून समन्स बजावण्यासाठी वाढीव वेळेची मागणी केली आहे. या प्रकरणात अजून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याने गेल्या आठवड्यातच खडसे दाम्पत्याला प्रोसेस इश्यू करण्यात आलेले आहेत. यानंतर आता चौकशीसाठी अजून समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती ईडीने न्यायालयात दिली. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले असून ते आपण या लिंकवर क्लिक करून वाचू शकतात.

Protected Content