रोहित पवारांचे फेसबुक पोस्टद्वारे अजितदादांना आवाहन

rohit pawar

मुंबई प्रतिनिधी । राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असून यात हक्काची माणसे दुरावू नयेत अशी अपेक्षा व्यक्त करत अजितदादांना रोहित पवार यांनी परत येण्याचे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न होत आहेत. यात आता आमदार रोहीत पवार यांची भर पडली आहे. त्यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अजितदादांनी परत येण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टमध्ये ते म्हणतात की, आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,

पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती पवार साहेब होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं असे यात म्हटले आहे.

खाली पहा : रोहीत पवार यांची फेसबुक पोस्ट.

Protected Content