राऊतांच्या बोलण्यातून चोरांच्या मनात चांदणं दिसतय ! : चित्रा वाघ

मुंबई प्रतिनिधी | महाविकास आघाडीच्ये नेत्यांना इन्कम टॅक्स आणि ईडीची इतकी भिती का वाटते ? असा प्रश्‍न विचारत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राऊतांच्या बोलण्यातून चोरांच्या मनात चांदणं दिसतयं असा टोला मारला आहे.

संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ईडी, सीबीआयला जम्मू-काश्मीरमध्ये पाठवा. खूप पॉवरफुल्ल लोकं आहेत. पाठवा ना. अतिरेकी पळून जातील. ते आमच्यावर ज्या प्रकारे ईडी, सीबीआयच्यामाध्यामातून हल्ला करता, या तिन्ही चारही संस्था तुम्ही बदनाम केल्या आहेत. या संस्थांचा तुम्ही राजकीय गैरवापर केला आहे. जा ना काश्मीरमध्ये पाठवा ना. किरीट सोमय्यांना काश्मीरमध्ये पाठवा. आम्ही अतिरेक्यांची कागदपत्रे देऊ. फिरत बसतील काश्मीर, अनंतनाग, बारामुल्ला. जा म्हणा, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

दरम्यान, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ईडीची एवढी भीती वाटतेय. सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनात चांदणंफ दिसतंय. केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लुटणा-या टोळी विरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केलाय. हे अलीबाबा अन् ४० चोरांचंफसरकार..चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेलफ, असं ट्वीट करुन चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. यासोबत सर्वज्ञानी संजय राऊतांचा संताप समजू शकते.. चुकवलेले लाखों रूपये मागच्या दारानं लपत छपत पुन्हा जमा करावे लागले याचाच अर्थ केंद्रीय यंत्रणा योग्य मार्गावर आहे. आता आदळआपट करून उपयोग नाही.. जैसी करणी, वैसी भरणी, असं ट्वीटही चित्रा वाघ यांनी केलंय.

 

Protected Content