जळगाव प्रतिनिधी । बदलत्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमिवर जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तिकिट हे अभियंता प्रकाश पाटील यांना मिळणार असल्याचे निश्चीत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप श्रेष्ठींनी या धक्कातंत्राला मंजुरी दिल्याचे समजते.
राजकीय स्थितीत बदल
जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार अर्थात ए.टी. पाटील आणि रक्षाताई खडसे यांना भाजपचे पुन्हा तिकिट मिळणार असल्याचे निश्चित मानले जात होते. यापैकी रक्षाताई खडसे यांच्या नावाला तर पक्षातून कुणाचा विरोधदेखील नसला तरी ए.टी. पाटील यांच्याऐवजी अन्य नेत्यांनी उत्सुकता दाखविली होती. यात पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ व चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांच्या नावाचा समावेश होता. यात जळगाव येथील अभियंता प्रकाश पाटील यांचे नावदेखील घेतले जात होते. आता बदलत्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमिवर भाजपचे तिकिट हे प्रकाश पाटील यांनाच मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.
जलतज्ज्ञ म्हणून भरीव कामगिरी
प्रकाश पाटील हे मूळचे खेडगाव नंदीचे (ता. पाचोरा) येथील रहिवासी होत. त्यांचे वडील रघुनाथ पाटील हे जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यांनी बी.ई सिव्हील इंजिनिअरींगची पदवी संपादन केली आहे. सार्वजनीक बांधकाम खात्यामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असतांना त्यांनी नोकरीचा राजीनामा देत व्यवसायात पदार्पण केले. यानंतर मे. पी.आर. पाटील इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स या फर्मच्या माध्यमातून त्यांनी जलसंपदा खात्याच्या कामांसाठी कन्सल्टींगची सेवा सुरू केली. विशेष करून धरण व बंधार्यांच्या डिझाईनमध्ये ते ख्यातप्राप्त असून आज ते या क्षेत्रातील तज्ज्ञ मानले जातात. जिल्ह्यातील बहुतांश जलसिंचन योजनांचे सल्लागार हे प्रकाश पाटील हेच असल्याची बाब कुणाला फारशी ज्ञात नाही. आजवर सातत्याने लो-प्रोफाईल पध्दतीत राहणारे प्रकाश पाटील हे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांमध्ये गणले जातात.
विजयरथ कायम ठेवण्याचे गणित
जळगाव लोकसभा मतदारसंघात प्रकाश पाटील यांच्या नावाने कोरी पाटी असणारा व उच्च शिक्षित उमेदवार देऊन भाजप जोरदार आव्हान उभे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाटील यांनी आज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांसह अन्य नेत्यांची भेट घेतली असून त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचा विजयरथ हा सुरूच राहण्यासाठी प्रकाश पाटील यांना पक्षाची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे समजते. त्यांच्यासाठी ना. गिरीश महाजन हे आग्रही असल्याची बाबदेखील त्यांच्या पारड्यात भर टाकणारी ठरली आहे.
जळगावकरांमध्ये लढत
राष्ट्रवादीची उमेदवारी आधीच गुलाबराव देवकर यांना मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून भाजपची उमेदवारी प्रकाश पाटील यांना मिळण्याचेही संकेत मिळाले आहेत. यामुळे पहिल्यांदाच खासदारकीसाठी दोन जळगावकरांमध्ये टक्कर होणार आहे. आता एक गमतीशीर योगायोग असा की, गुलाबराव देवकर यांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर प्रकाश पाटील यांचे कार्यालय आहे. तर त्यांचे निवासस्थानदेखील देवकरांच्या घराच्या मागील बाजूस समर्थ कॉलनीत आहे.
Ekhadya Garib/uchhahikshit karykartyala umedvari deun bagha
आपल्या गावातील मित्र आहे सर्व भरपूर मदद करतील
All the best my dear friend
We are all with you.
Aage badho.✌jaroor jitenge.
Congratulations Dada
Dada,congratulation you are our next M.P. we are all with you!!!
अभिनंदन साहेब आपल्यामुळे एरंडोल तालुक्यातील अंजनी व भालगाव प्रकल्प हे नदीजोड ने जोडले जाऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल
दादासाहेब अगदी योग्यवेली योग्य संधी चालून आली आहे.विजय निश्चित आहे.यात काही शंका नाही.निवडून आल्यानंतर सामान्यातल्या सामान्य कर्यकर्ता व जगाचा पोशिंदा शेतकरी राजा याला विसरता कामा नये.आज जलगाँव मतदार संघात उमेदवार बदलाची तिव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये व सामान्य जनतेमध्ये आहे
दादा तयारी ला लागा हम तुम्हारे साथ है
दादासाहेब अगदी योग्यवेली योग्य संधी चालून आली आहे.विजय निश्चित आहे.यात काही शंका नाही.निवडून आल्यानंतर सामखन्यातला सामान्य कर्यकर्ता व जगाचा पोशिंदा शेतकरी राजा याला विसरता कामा नये.आज जलगाँव मतदार संघात उमेदवार बदलाची तिव्र भावना कार्यकर्त्यांमध्ये व सामान्य जनतेमध्ये आहे
दादा तयारी ला लागा हम तुम्हारे साथ है
दादा आपल्या सारखा उत्साही व पाण्या बाबतीत आभ्यास असलेल्या व्यक्तीला जर भा.ज.पा. चे तिकीट मिळणार असेल तर जिल्ह्याचे भले होण्यास वेळ लागणार नाही अभीनंदन दादा
प्रकाश मीत्रा संधी चांगली आहे परंतु सध्याचे राजकारण स्पेशली जळगाव जिंल्हयाचे राजकारण हे डर्टी आहे अगदी कुटूंब उध्वस्त होई पर्यंतच्या स्तरावर गेले आहे म्हणुन बघ आता तु सुखी आहे
Infrastructure च्या कामांमध्ये जळगांव जिल्ह्याचा विकास शून्य असून धरण-बंधारे आहेत पण त्यात पाणी कुठे आहे ? जैन इरिगेशन सोडून रोजगारासाठी दुसरा कोणताही मोठा प्रकल्प नाही, महानगर पालिका, विधानसभा,लोकसभा मतदार संघ आपल्याच पक्षाच्या ताब्यात असून जळगांव शहराचा विकास खुंटलेलाच आहे ही खरी शोकांतिका आहे.
भूतकाळात डोकावून पाहिल्यास जळगांव शहराच्या विकासासाठी कोणत्याही पक्षाच्या विद्यमान अथवा माजी आमदाराने विधानसभेत किंवा खासदाराने लोकसभेत भरीव प्रयत्न सुद्धा केलेले दिसून येत नाही. फक्त उमेदवार बदलून कोणता विकास साध्य होणार आहे देवच जाणे?
नाईलाजास्तव का होईना तरीही आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या शुभेच्छा …
Dada Abhinandan.
दादा आपणास खूप खूप शुभेच्छा
आदरणीय दादासाहेब, आपली सामजिक कारकीर्द आणि माणुसकीची ओढही आम्ही फार जवळून पहिली आहे … आपली सामजिक बांधिलकी सामान्य माणसाप्रती, जिव्हाळा याची सतत आम्हला प्रचिती येते… आपल्या समवेत आम्ही नक्कीच कायम सोबत असु… नक्की येत्या निवडणूकित जळगाव चा गड आपण राखू हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना…! आपल्याला खुप खुप शुभेच्छा …!
Nice, Engineer candidate good ,Education la mahatva ale ani kharach aaj garaj ahe badal honyachi.
1च no दादा आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हला
Badal kala chi garaj ahe
जळगाव ला खासदार नेहमीच सुविद्य व उच्चशिक्षित मिळाले आहेत पण जिल्ह्यासाठी भरीव कामगिरी केलेली दिसत नाही .. अर्थात 1 – 2 सन्माननीय अपवाद आहेत
आदरणीय प्रकाशदादा सुद्धा उच्चशिक्षित आहेत , सामाजिक विषयाची जाण आहे , जलसिंचन योजनांचे सल्लागार असल्यामुळे शेतकऱ्यांची तगमग दादांना नक्कीच माहिती असेल .. शेतकऱ्यांना एक मसीहा मिळेल .. फक्त पक्षांतर्गत राजकारणात हे व्यक्तीमत्व भरडले जाऊ नये हीच अपेक्षा
दादा आपणास खूप खूप शुभेच्छा