पेरू प्रक्रिया उद्योग व कोल्ड स्टोरेज साठी प्रयत्न करणार – आमदार मंगेश चव्हाण

WhatsApp Image 2019 12 24 at 10.38.58 AM

चाळीसगाव, प्रतिनिधी | मीनी कोकण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील बहाळ येथील प्रसिद्ध पेरू आणि बोर ला व्यापक प्रसिद्धी आणि बाजारपेठ मिळावी या उद्देशाने पं.स.सभापती स्मितल बोरसे व माजी पं.स.सदस्य दिनेश बोरसे यांच्या संकल्पनेतील पेरू – बोर महोत्सवाचे आयोजन केले होते. या मोहत्सवाचे उद्घाटन खासदार उन्मेश पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

बहाळ व परिसरातील पेरू – बोर उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विविध प्रकारची फळे प्रदर्शनासाठी ठेवली होती. याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांची पेरू व बोर यांची तुला करण्यात आली. मंचावर प्रदर्शनाचे उद्घाटक म्हणून खासदार उन्मेश पाटील, पं.स.सभापती स्मितल दिनेश बोरसे व दिनेश बोरसे, उपसभापती संजय पाटील, नगराध्यक्षा आशालता विश्वास चव्हाण, मार्केट सभापती सरदारशेठ राजपूत, न.पा.गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, जि.प.सदस्या मंगल भाऊसाहेब जाधव, मोहिनी अनिल गायकवाड, पं.स.सदस्य सुभाष पैलवान, पियुष साळुंखे, सुनील पाटील, दत्तू मोरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष कपिल पाटील, रा.वि.संचालक सुधीर आबा पाटील, मार्केट संचालक मच्छिंद्र राठोड, अलकनंदा भवर, संपदा उन्मेश पाटील, प्रतिभा मंगेश चव्हाण, नगरसेवक बापू अहिरे, नगरसेविका विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, नमो राठोड, वाय.आर.सोनवणे, माजी नगरसेवक निलेश महाराज, कैलास पाटील, बहाळ गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.प.सदस्य. विकासो चेअरमन, व्हा.चेअरमन आदी उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, पुराणकालीन बहुलादेवी माता मंदिर, श्रीक्षेत्र ऋषी पांथा या दैवतांच्या सानिध्यात वसलेले बहाळ गाव, जेव्हडी या गावाची जमीन कसदार तेव्हडीच इथली माणस दमदार आहेत. अतिशय मेहनतीने या भागातील शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून बहाळ गावाचे नाव देशभरात नेले आहे. आज दिनेशभाऊ व स्मितलताई यांनी एक पाउल पुढे जात आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित पेरू – बोर महोत्सव आयोजित करून आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आज पेरूवर आधारित अनेक खाद्य पदार्थ मेट्रो सिटीमध्ये प्रसिद्धीस येत आहेत. सदर खाद्य पदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना आपल्या बहाळ येथील पेरू पुरवता यावेत यासाठी एक वेगळी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेणार असून साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात या भागातील पेरू बागांचे नुकसान झाले होते, यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात मदतीची अपेक्षा असताना शासनाने मात्र एक रुपयाचीही तरतूद न करता शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी विधानसभेत असो की बाहेर असो मी सदैव शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचा विश्वास देखील आमदार चव्हाण यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिला.

Protected Content