विरोधी पक्षाची गँग अयशस्वी झाली : मलीक

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण होत असतांना विरोधी गँग सरकार पाडण्यात अयशस्वी झाल्याचा टोला मारत नवाब मलीक यांनी टीका केली आहे.

या संदर्भात मलिक म्हणाले की, भाजप आता हतबल झालंय,दोन वर्षांनंतरही सरकार पाडता आलं नाही, आमदार खरेदीचा कार्यक्रमही इथे करता आला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.   भाजपमध्ये आता चंद्रकांत पाटलांना हटवायचंय की देवेंद्र फडणवीसांना हटवायचंय? असा सवाल करत ते म्हणाले की, भाजपमध्ये अंतर्गत नवे विरुद्ध जुने वाद निर्माण झाला होता. फ्रॉड लोकांना सोबत घेऊन फडणवीस राजकारण करत होते. ज्यांना फडणविसांनी साईडलाईन केलं होतं असे तावडेंसारखे नेते आता केंद्रात मोठ्या पदावर गेले आहेत. यावरुन दिसतंय की साईड लाईन केलेल्यांना पुन्हा पुढे आणायचंय. त्यामुळे आता भाजपचं केंद्रीय नेतृत्व काय तो निर्णय घेईल, असं नवाब मलिक म्हणाले.

दरम्यान, नवाब मलिक म्हणाले की, पक्षातून गेलेल्यांच्या घरवापसीचा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होणार आहे. तावडेंचं तिकीट फडणवीस यांनी कापलं, त्यांचं केंद्रात पुनर्वसन केलं. भाजपमध्ये अजुनही खदखद सुरूय. येत्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भाजपतून अनेक नेते येतील, असंही ते म्हणाले.

Protected Content