यंदा 15 ऑगस्टला टीम इंडियाचा ‘नवा इतिहास’

indian

पोर्ट ऑफ स्पेन वृत्तसंस्था । भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वन डे सामना आज म्हणजे 14 ऑगस्टला खेळवण्यात येणार आहे. पण, त्याचा निकाल भारतीय प्रमाण वेळेनुसार मध्यरात्री म्हणजे 15 ऑगस्टला लागणार आहे. भारतीय संघ क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच देशवासियांना विजयी भेट देऊ शकतो. यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली नवा इतिहास बनविण्याची नामी संधी टीम इंडियाला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, यंदाचा स्वातंत्र्यदिन भारतीय क्रिकेट संघासाठी खास ठरू शकतो. कारण, 72 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाला 15 ऑगस्टला झालेल्या एकही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही आणि यंदा विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हा कटू इतिहास पुसून टाकण्याची संधी टीम इंडियाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आणि तिसरा सामना जिंकून मालिका 2-0 अशी खिशात घालण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 15 ऑगस्टला पाच सामने खेळले आहेत आणि हे सर्व कसोटी सामने होते. प्रजासत्ताक दिनीही वन डे सामन्यात भारताला विजय मिळवता आलेला नाही. 1986 साली अॅडलेड येथे ऑस्ट्रेलियाने भारतावर 36 धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2000 मध्येही ऑस्ट्रेलियाकडूनच भारताला 152 धावांनी हार पत्करावी लागली होती. 2015मध्ये खेळलेला सामना अनिर्णित राहिला होता. दुसरीकडे ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये भारताने 26 जानेवारी 2016 मध्ये भारताने अॅडिलेड येथे ऑस्ट्रेलियावर 37 धावांनी विजय मिळवला होता. पण, पुढच्याच वर्षी कानपुर येथील सामन्यात इंग्लंडने 7 विकेट राखून विजय मिळवला होता.

Protected Content