राज्यात कोरोनामुक्तांची संख्या सहा लाखांच्या उंबरठ्यावर – राजेश टोपे

मुंबई- राज्यात आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. आज १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०१ हजार ७०३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज निदान झालेले १७,४३३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१६२२ (३४), ठाणे- ३०२ (५), ठाणे मनपा-३०१ (१), नवी मुंबई मनपा-३७१ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५०८ (४), उल्हासनगर मनपा-२५ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-२१९ (३), पालघर-२५२ (७), वसई-विरार मनपा-१७१ (८), रायगड-४५८ (१०), पनवेल मनपा-२८८ (१), नाशिक-३२७ (६), नाशिक मनपा-६३१ (१४), मालेगाव मनपा-७०, अहमदनगर-३७४ (५),अहमदनगर मनपा-२१२, धुळे-८६ (१), धुळे मनपा-११० (१), जळगाव- ७६२ (१०), जळगाव मनपा-११२ (५), नंदूरबार-१०१ (३), पुणे- ९०२ (९), पुणे मनपा-१७०६ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-१००६ (२), सोलापूर-३६२ (११), सोलापूर मनपा-६१ (२), सातारा-६८३ (६), कोल्हापूर-४०९ (१०), कोल्हापूर मनपा-१९४ (१०), सांगली-४१९ (१०),

सांगली मिरज कुपवाड मनपा-३३४ (५), सिंधुदूर्ग-४०, रत्नागिरी-१४६ (२), औरंगाबाद-१९७,औरंगाबाद मनपा-८८ (१), जालना-१३५ (२), हिंगोली-४५ (१), परभणी-३९, परभणी मनपा-४७ (१), लातूर-२०५ (५), लातूर मनपा-११३ (२), उस्मानाबाद-१६८ (६),बीड-१३० (१), नांदेड-१८१, नांदेड मनपा-१४५ (१), अकोला-३८, अकोला मनपा-१४, अमरावती-७ (१), अमरावती मनपा-३० (२), यवतमाळ-१२० (३), बुलढाणा-७४ (१), वाशिम-४७, नागपूर-३१६ (३), नागपूर मनपा-११८४ (३५), वर्धा-६४, भंडारा-७० (१), गोंदिया-१०९ (४), चंद्रपूर-११७, चंद्रपूर मनपा-८४, गडचिरोली-३६, इतर राज्य २४ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ८४ हजार नमुन्यांपैकी ८ लाख २५ हजार ७३९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२७ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ०४ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५ टक्के एवढा आहे.

Protected Content