वरणगाव नगरपरिषदेचे दुर्लक्ष, शिवाजीनगरात रस्त्याची दुर्दशा

वरणगाव प्रतिनिधी । येथील शिवाजी नगरात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्यावर प्रचंड चिखलाचे साम्राज्य पसरल्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याप्रकरणी स्थानिक रहिवाशांनी नगर परिषदेकडे वारंवार तक्रार करूनही नगरपरिषद दुर्लक्ष करत असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून बोलले जात आहे.

वरणगाव शहराची लोकसंख्या जवळपास पन्नास हजाराच्या आसपास आहे. परंतु रस्त्याची सर्रासपणे दुर्दशा झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नगरपरिषदेवर सध्या प्रशासक नेमलेला असूनही या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील शिवाजीनगर परिसरामध्ये नागरिकांना ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत शिवाजीनगर मधील रस्ते पूर्ण चिखलमय होऊन गेली आहेत. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

 

 

Protected Content