राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री घेणार ‘जनता दरबार’

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री ३१ ऑगस्टपासून जनता दरबार घेणार असून यात सर्वसामान्य जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आता पक्ष कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. यात आपल्या खात्यासह अन्य प्रश्‍नांच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. ३१ ऑगस्टपासून मंत्री जनता दरबार सुरू होणार असल्याची माहिती पक्षातर्फे देण्यात आली आहे.

दरम्यान, जनता दरबारासाठी पक्षाने वेळापत्रक देखील जारी केले आहे. याच्या अंतर्गत सोमवारी जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक, मंगळवारी छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, बुधवारी अजित पवार,राजेश टोपे, दत्तात्रेय भरणे आणि प्राजक्त तनपुरे, गुरुवारी हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे व दिलीप वळसे पाटील तर शुक्रवारी अनिल देशमुख, अदिती तटकरे, संजय बनसोडे हे मंत्री जनतेच्या समस्यांचे निराकरण करणार आहेत.

Protected Content