धक्कादायक : कौटुंबिक वादातून मुलीची हत्या

751cad9e 960f 4507 a3c3 f7f0f7a39162

जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून स्वत:च्या सात वर्षीय मुलीस मारून टाकत गिरणेच्या पुलाखाली फेकून देण्याचा गंभीर प्रकार आज घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरानजीक असणार्‍या बांभुरी गावाजवळच्या गिरणा नदीच्या पात्रात पुलाच्या अगदी खालील बाजूस एका बालिकेचा मृतदेह दुपारच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संदीप यादवराव चौधरी (करणगाव ता. अमळनेर) हा सध्या जळगाव तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत राहतो. तो वेल्डींगच्या दुकानात काम करून उपजिवीका करत होता. काल सायंकाळी त्याने पत्नीला फोन करून आपण आपल्या मुलीची हत्या करणार असल्याचा एसएमएस केला होता. आज सकाळी सात वाजता त्याने क्लासमधून मुलीला घेऊन गेला. यानंतर दुपारी गिरणा नदीच्या पुलाखाली त्याच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. या संदर्भात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Protected Content