महागठबंधनच्या विषयावर मनसे नेत्यांची कृष्णकुंजवर खलबतं

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही, असे सांगत मनसेला महागठबंधनमध्ये स्थान नसल्याचे स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मनसे नेते आणि पदाधिकारी उपस्थित आहेत.

राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळीक वाढते आहे का? असे वाटत असतानाच शरद पवारांनी मात्र निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही असे म्हटले आहे. खुद्द शरद पवारांनीच महागठबंधनमध्ये मनसेला स्थान नसल्याचे सांगितल्याने मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे.

Add Comment

Protected Content