उद्या आ.चंद्रकांत पाटील शेतकऱ्यांसह करणार जलसमाधी आंदोलन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकणे, संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई वसूल करावी, अशा विविध मागणीचे राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्या पुर्व न झाल्यास शेतकऱ्यांसह (दि.१७) रोजी सकाळी १० वाजता जलसमाधी आंदोलन करणार, अशा इशारा आ. चंद्रकांत पाटील यांनी निवेदनावेळी दिला आहे.   

सद्या पावसाने दांडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या दीड महिन्यांपूर्वी वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत असलेल्या ओझरखेडा धरण पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचे केळी व इतर पिके संकटात आल्याने शेतकऱ्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यानुसार गेल्या एक महिन्यांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्याने  पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी डॉ .अभिजित राऊत व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांची आढावा बैठक झाली यात ओझरखेडा धरणात तातडीने पाणी सोडण्यासाठी चर्चा होत पालकमंत्र्यांनी नियमित देखभाल दुरुस्ती व पंप दुरुस्ती साठी तात्काळ कार्यकारी संचालक यांचेशी चर्चा करून निधी  उपलब्ध करून दिला होता. परंतु जलसंपदा विभागाचे अधिकारी यांनी याबाबत आजतागायत तातडी न दाखविल्याने दरम्यानच्या काळात मुबलक पूरस्थिती हतनूर धरणाला सुरू होती. अशा परिस्थितीत पाणी ओझरखेडा धरणात फुलफिल झाले असते. परंतु निव्वळ हलगर्जीपणा संबंधित अधिकाऱ्यांनी केला. यामुळे सदरील धरण कोरडे ठाक होण्याच्या मार्गावर असून या पाणलोट क्षेत्रातील हजारो हेक्टर शेत जमिनीतील केळी सह इतर पिके संकटात सापडली आहे. 

याप्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दि.11/08/2021 रोजी मुंबई येथे व जिल्हाधिकारी डॉ राऊत यांना दि.10/08/2021 रोजी ओझरखेडा धरणात तातडीने पाणी टाकणे व संबंधित निष्काळजी व बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई वसूल करावी, अशा मागणी साठी निवेदन दिले होते. परंतु आद्यपपावेतो कुठलीही कारवाई न झाल्याने पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व हजारो शेतकरी थेट ओझरखेडा धरण येथे उद्या दि.17 ऑगष्ट 2021 रोजी सकाळी 11.00 वा.जलसमाधी आंदोलन करणार आहे.

Protected Content