मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी अपघातग्रस्तांची घेतली भेट

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्यांची मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धिर दिला. तर अपघातात मयत झालेल्या महिलेला मुख्यमंत्र्यांनी १० लाखांची मदत जाहीर केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

Image Credit Source: Live Trends News

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणार्‍या भाविकांच्या बसला अपघात होउन बस गडाच्या दरीत कोसळल्याने अपघात झाला. त्यात अमळनेर तालुक्यातील महिला ठार झाली व तालुक्यातीलच इतर १३ जण जखमी झाल्याने त्या अपघाताची माहिती समजतात मंत्री अनिल पाटील यांनी मुंबईहून तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालय गाठून जखमींची विचारपूस केली.

बुधवारी पहाटे ६:३० च्या सुमारास हा अपघात झाला. यातील १६ प्रवासी हे अमळनेर तालुक्यातील मुडी या गावचे असून गडावरील ४ प्रवासी होते अशी माहिती मिळताच मंत्री अनिल पाटील यांनी मुंबईहून तातडीने नाशिक येथे नाशिक जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची माहिती त्यांनी घेतली. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार असून मोफत उपचार करण्याची सूचना रुग्णालय प्रशासनाला दिली.

दरम्यान, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांना एसटी महामंडळातर्फे १० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. रुग्णांना तातडीने मोफत उपचार सुरू होऊन संपूर्ण व्यवस्था झाल्याने त्यांनी मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले. तसेच, आज मतदारसंघातील मंत्री यांच्यामुळे आलेल्या या कठीण परिस्थितीत आम्हाला खूप मोठा आधार मिळाला,प्रशासनाकडून आम्हाला खूप मोठी मदत झाली अशी माहिती अपघातातील जखमींच्या नातलगांनी व्यक्त केली.

Protected Content