यावल येथे बकरी ईदनिमित्त शांतता समितीची बैठक

peace commity 1

यावल, प्रतिनिधी | बकरी ईद व पुढे येणारे सर्व उत्सव व सण समाजातील सर्व घटकातील नागरिकांनी एकत्र येवुन शांततेच्या व सौहार्दपुर्ण वातावरणात साजरे करावे, असे आवाहन येथील तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी आज (इ.१०) सायंकाळी येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत केले.

 

येथील तहसील कार्यालयाच्या आवारात ६.०० वाजता ही बैठक तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीला जेष्ठ शांतता समिती सदस्य चंद्रकांत देशमुख, हाजी शब्बीर खान, नगरसेवक सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, नगरसेवक दिपक बेहडे, आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचे प्रदेश अध्यक्ष एम.बी. तडवी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, माजी नगरसेवक हाजी ईकबाल खान, उमेश फेगडे, शिवसेनेचे मुन्ना पाटील, जगदीश कवडीवाले, पुंडलीक बारी, भाजपाचे गोपाळसिंग पाटील, अमोल देशमुख, मा.न.से. गुलामरसुल दस्तगीर, संतोष खर्चे, आदी सामाजिक कार्यकर्त व पक्षांचे पदाधिकारी मोठया संख्येने उपास्थित होते. हाजी शब्बीर खान, प्रा. मुकेश येवले, पुंडलीक बारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Protected Content