जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा रागातून तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका एका विवाहितेला मारहाण करून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवार ९ मे रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. या संदर्भात दुपारी ४ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या गावात ३२ वर्षीय विवाहिता ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान या महिलेने गावात राहणारे सुपडू पंजू भोई आणि दीपक सुपडू भोई यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याचा राग मनात धरून शुक्रवारी ९ मे रोजी सकाळी ११ वाजता सुपडू भोई आणि दीपक भोई यांनी महिलेला शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर पीडित महिलेने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी सुपडू पुंजू भाई आणि दीपक सुपडू भोई दोन्ही रा. कुऱ्हा पानाचे ता. भुसावळ यांच्या विरोधात दुपारी ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नितीन चौधरी करीत आहे.