दीड लाखासाठी बिलवाडी येथील विवाहितेचा छळ; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मूलबाळ होत नाही तसेच माहेरून प्लॉट घेण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत या कारणावरून तालुक्यातील बिलवाडी येथील माहेर असलेल्या  विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ४ जणांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिलवाड येथील कविता ऊर्फ भैरवी  यांचा काही वर्षापुर्वी शिरपूर तालुक्यातील कळमसरे येथील लहु देवीदास बागुल यांच्याशी विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीसह सासू जेठ नणंद यांनी कविता हिस प्लॉट घेण्यासाठी तिच्या माहेरून दीड लाख रुपये आणावेत अशी मागणी केली. यासह कविताला मूलबाळ होत नाही या कारणावरून तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ केला. एके दिवशी कविताला तिच्या पतीने मारहाण करून घराच्या बाहेर काढून दिले पैसे  आणल्याशिवाय परत येऊ नको असा दम दिला. अशा आशयाच्या कविता ऊर्फ भैरवी बागूल या विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पती लहू बागूल,  सासू नादरबाई देविदास बागुल, जेठ कुश देविदास बागुल, नणंद प्रतिभा चंद्रकांत सोनवणे सर्व रा. कळमसरे ता. शिरपुर  जिल्हा धुळे यांच्याविरोधात रविवार २० फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहेत.

Protected Content