कोरोना फक्त रात्रीच फिरतो का ? : मनसे नेत्याचा सवाल

मुंबई : मुख्यमंत्री, कोरोना काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं कारण काय आहे? असे प्रश्‍न विचार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी रात्रीच्या संचारबंदीवर टीका केली आहे.

टिव्ही-९ या वृत्तवाहिनीशी बोलतांना संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्रसोडले आहे. काही दिवसांपूर्वी उद्योगपतींना महाबळेश्‍वरला जाण्याची परवानगी कशी दिली? त्यांच्यावर काय कारवाई झाली? असे सवाल संदीप देशपांडे यांनी सरकारला विचारले आहेत. या संपूर्ण वर्षात लोकांचा कणा मोडला आहे. हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत. प्रत्येक वेळी कोरोनाची भीती दाखवत आहात, तर अमेरिकेसारखं पॅकेज द्या अशी मागणीही संदीप देशपांडे यांनी केली आहे.

कोरोनाची फक्त भीती दाखवू नका. तुमची ती नाईट लाईफ, लोकांना फक्त कोरोना, असं आहे असा टोला देशपांडेंनी लगावला. या लॉकडाऊनच्या काळात कोणी नाईट लाईफ एन्जॉय केली, हे सर्वांना माहीत आहे, समजने वाले को इशारा काफी है, नाव घ्यायची गरज नाही असा इशारा त्यांनी दिला. व्हीआयपी पार्ट्यांना सवलत दिली जाते, गरिबांनी हॉटेलमध्ये जाऊन जेवायचं नाही, हे कुठलं लॉजिक आहे? असा सवालही संदीप देशपांडेंनी विचारला आहे.

Protected Content