नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करून त्वरित भरपाई द्या ; किनगाव परिसरातील शेतकऱ्यांची मागणी

यावल –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |   गेल्या आठ दिवसांपासून यावल तालुक्याच्या पश्चिम भागातील चिंचोली, नायगाव, किनगाव आडगाव परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे.  या पिकांचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 

मागील आठ दिवसांपासून यावल तालुक्याच्या पश्चिम भागातील चिंचोली, नायगाव, किनगाव, आडगाव परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापूस, मका, सोयाबीन, उडीद, मुंग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातात तोंडाशी आलेला घास या निसर्गामुळे वाया जाणार असून शेतकऱ्यांचे कापसाचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. जून महिन्याच्या प्रारंभी लागवड झालेल्या कापूस पिकांच्या कैरीला अक्षरशः कोंब आले असून पहिला कापुस काढणीचा हंगाम संपूर्ण वाया जाणार आहे. तर बऱ्याच ठिकाणी कापसाच्या कैऱ्या झाडावरच सडल्या असून त्या सडलेल्या कापसाच्या कै-या तोडण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा  मजुर लावुन त्या कै-या तोडाव्या लागणार आहे.  अजून दोन दिवस जर पाऊस सुरू राहिला तर शेतकऱ्यांचे पन्नास टक्के नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात आडगाव, कासारखेडे, नायगाव, चिंचोलीसह परिसरात जून महिन्याच्या प्रारंभी लागवड झालेल्या कापसाचे अधिक नुकसान झालेले दिसून येत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी जास्त नुकसान झालेल्या कापूस पिकांचे पंचनामे करण्याची ही मागणी केली आहे. मका पिकांवर हे अति पावसामुळे आळ्यांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे मका पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

 

Protected Content