ओडिशात लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात; २० प्रवाशी जखमी

Indian railway

भुवनेश्वर वृत्तसंस्था । मुंबई-भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. यातील पाच जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. सालागाव-निरगुंडी स्थानकांदरम्यान हा सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे मार्ग भरकटून लोकमान्य टिळक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १२८७९) एका मालगाडीला धडकली. या धडकेनंतर गाडीचे सात डबे रुळावरून घसरले. त्यात अनेक जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाने मदत व बचावकार्य हाती घेतले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. मात्र, धुक्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. रेल्वेच्या अपघातात 20 हून अधिक प्रवाशी जखमी झाले असून यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

Protected Content