खानापुर येथे शेतमुराची गळफास घेवून आत्महत्या

khanapur news

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील खानापुर येथिल शेतमजुराने गरीबीला कंटाळून गळफास घेवुन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेच्या सूमारास घडली.

खानापुर येथील रहिवासी कैलास देवराम पाटील (वय-४८) यांनी गरीबीला कंटाळून व दुष्काळी परीस्थितीमुळे हाताला काम मिळत नसल्याने २० रोजी रात्री ११ ते १२ च्या सुमारास खानापुर येथील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कानिफनाथ महराज यांच्या देवस्थानच्या समोर असलेल्या खा.रक्षाताई खडसे यांच्या खासदार निधीतून उभारण्यात आलेल्या हायमास्ट लाईटाच्या खांबाला रेशमाच्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला.

सदर घटनास्थळा जवळून रात्री सोहेल शे.शकील हा आपला हाटेलचा व्यवसाय आटोपून घरी येत असताना हि घटना लक्षात आली. मात्र तो घाबरू न घरी निघुइगेला नंतर घरी जावुन घटनास्थळा जवळ राहत असलेल्या माजी ग्रा.पं. सदस्य वैभव धांडे यांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. त्यानंतर वैभव धांडे यांनी दरवाजा उघडून सदर बाबीची चौकशी करून मयताजवळ जावुन ओळख पटवून दत्त मंदिर संस्थानचे अध्यक्ष भास्कर पाटील यांना रात्री १२ वाजेच्या सुमारास फोन करून सांगितले की, तुमच्या वाड्यातील कैलास पाटील याने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे लगेचच भास्कर पाटील व त्याच्यासह मयत कैलास पाटील यांचे भाऊबंद यांनी घटनास्थळी धाव घेतली. पो.पा.दिपक महाजन, संजय महाजन यांनी रात्री येवुन सदर घटनेची माहीती रावेर पोलिस ठाण्यात दिली लगेचच रात्री २वाजता पो का निलेश चौधरी, गफूर शेख, यांचेसह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवुन परीस्थिती जाणून घेत लगेचच घटनास्थळी पंचनामा करून प्रैत रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठवले.

२१ रोजी सकाळी रावेर ग्रामीण रुग्णालयात डॉ.महाजन व सौ.पाटील यांनी शवविच्छेदन करुन प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. खानापुर येथे दुपारी ११ वाजता शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात अठरा विश्व दारीद्र, त्यात घरची परीस्थिती एकदम हलाखीची, राज्यात ओला दुष्काळ पडल्याने हाताला काम नाही. घरात पत्नी, एक मुलगा, एक विवाहीत मुलगी असा परीवार असल्याने पोटाला अन्न नाही अशा परीस्थितीत कैलास पाटील यांनी फाशी घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची दुदैवी घटना घडल्याने कैलास पाटील हे गावात सगळ्या शी मनमिळाऊ पणाने वागत असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मयत कैलास पाटील यांना शासकीय मदत मिळावी, अशी मागणी परीसरातुन होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी, जावाई, नातवंडे असा परीवार आहे. सदर घटनेची रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनात सपोनी सुनील कदम, पो.का. निलेश चौधरी करीत आहे.

Protected Content