‘त्या’ तरूणाच्या मृत्यूबाबत अफवांना बळी पडू नका : जामनेर तहसीलदारांचे आवाहन

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील टाकळी खुर्द ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीनंतर दोन विरोधी गटातील दगडफेकीत कथितरित्या मृत्यू झाल्याबाबत तहसीलदार अरुण शेवाळेनी निवेदन जारी करत अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

जामनेरच्या तहसीलदारांनी आज सायंकाळी जिल्हा माहिती केंद्राच्या माध्यमातून निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, जामनेर तालुक्यातील मौजे टाकळी खुर्द ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी तहसील कार्यालयात सुरळीत व शांततेत पार पडलेली आहे. मतमोजणीनंतर गाव पातळीवर दोन विरोधी गटांमध्ये दगडफेक झाली असून दोन इसमाना किरकोळ स्वरूपाची दुखापत झालेली आहे. तसेच त्याच गावातील धनराज श्रीराम माळी वय ३५ हे अचानक बेशुद्ध होऊन मयत झालेले आहेत. मयत धनराज माळी हे उमेदवार नसून तेथील उमेदवाराचे भाऊ होते. वैद्यकीय अधिकारी श्रेणी उपजिल्हा रुग्णालय जामनेर यांच्याकडील शवविच्छेदन अहवालात Problem Cause of Death is due to Mayocardial Infection However Viscera is Preserved For Confirmation असे नमूद केलेले आहे.
तोपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तालुका कार्यकारी दंडाधिकारी त्याचा तहसीलदार जामनेर यांनी केलेले आहे.

Protected Content