रेल्वे खाली आल्याने एकाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । तहसील कार्यालयाकडून शिवाजीनगरकडे जाणार्‍या मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर मालगाडीखाली आल्याने एकाने प्राण गमावल्याची घटना आज सकाळी घडली.

याबाबत वृत्त असे की, सध्या शिवाजीनगर पुलाचे काम सुरू असल्याने तहसील ऑफीसजवळून अनेक जण रेल्वे रूळांना ओलांडून ये-जा करत असतात. यात अनेक जण धोकेदायक पध्दतीत रूळ ओलांडतात. दरम्यान, आज सकाळी जळगावहून भुसावळकडे जाणार्‍या मालगाडीच्या खाली आल्याने एक जणाचे दोन्ही पाय कापले गेल्याची घटना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी याबाबत रेल्वे पोलिसांना माहिती दिले. सुमारे अर्ध्या तासानंतर रेल्वे पोलीस आले. मात्र तोवर त्याचे प्राण गेले होते. संबंधीत मृत व्यक्तीचे नाव कळू शकले नाही. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा घटनास्थळी रेल्वे पोलीस दाखल झाले होते.

Protected Content