मुस्लीम समुदायाच्या वस्त्यांमध्ये विकासाचा ठणठणाट

जळगाव प्रतिनिधी । महापालिकेत मुस्लीम समुदायाचे सात नगरसेवक असले तरी त्यांचा कोणताही प्रभाव नसल्याने त्यांच्या परिसरात विकास कामांचा ठणठणाट असल्याचे निवेदन आज देण्यात आले. महापालिकेने कामे करावीत अन्यथा कर भरणार नसल्याचा इशारा सुध्दा यात देण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबतचे वृत्त असे की, शहरातील विविध मुस्लिम बहुल वस्तीमधील सामाजिक कार्यकर्ते आपापल्या परिसरातील महानगरपालिकेच्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्रस्त झाले आहेत वर्तमानपत्रातील बातम्यांमध्ये ज्या भागातील नगरसेवक प्रभावी आहे त्या भागातील कामे होतात विरोधी पक्षाच्या नगरसेवकांचे कामे होत नसल्याच्या तक्रारी वाचण्यात येत आहे. शहरात सात मुस्लिम नगरसेवक निवडून आले असून त्यात दोन सत्ताधारी भाजपचे, दोन शिवसेनेचे तर तीन एमआयएमचे आहेत. या सात पैकी पाच महिला व दोन पुरुष आहेत. असे असूनही मुस्लीम वस्त्यांमध्ये कामे झालेली नाहीत.

या अनुषंगाने आज आयुक्तांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व फारुक शेख यांनी केले त्यांच्यासोबत मेहरुण चे अनिस शाह,अकसा नगरचे अर्शद खान व आमिर शेख, दत्तनगर चे अखिल पठाण,शेरा चौक चे अश्फाक शेख,रजा कॉलोनी परिसरातील सलीम इमानदार, अहेले हदीस मस्जिद परिसरातील इंद्रिस पटेल, मौलाना आझाद नगर चे कासिम उमर, इकबाल कॉलनी चे हारून शेख, मासूम वाडीचे मोहसीन युसुफ, कासम वाडीचे अजिज सिकलगर, सालार नगरचे अफजल पठाण, मन्यार वाड्याचे मुजाहिद खान व अब्दुल रउफ, जोशी पेठ चे गुलाब बागवान, इस्लाम पुरा चे अन्वर खान सिकलगर ,उस्मानिया पार्कचे परवेज शेख व काद्रि,शिवाजीनगर हुडको चे अल्ताफ शेख, गेंदालाल मिलचे रईस शेख, पिंपराला हुडको चे जाकिर पठाण, शिवाजीनगर चे मझहर खान, शनिपेठ नदीम मलिक, आदींचा समावेश होता.

यात जळगाव शहरातील अकसा नगर, मास्टर कॉलनी, नशेमन कॉलनी, एकबाल कॉलनी, दत्तनगर ,मौलाना आजाद नगर, सालार नगर ,कासमवाडी, मासूम वाडी ,सुप्रीम कॉलनी, उस्मानिया पार्क ,गेंदालाल मिल, हुडको शिवाजी नगर ,हूडको पिंपराला, खंडेराव नगर, जोशी पेठ, बागवान मोहल्ला,मन्यार वाडा, तांबापुर, आशा बाबा नगर, दंगलग्रस्त कॉलनी, आय वाय पार्क, अशा अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या वस्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे विकास कामे होत नसल्याची तक्रार आयुक्त सतीश कुलकर्णी यांना प्रत्यक्ष भेटून दिली.

संबंधीत वसाहतीमध्ये मुख्य अडचणी म्हणजे रस्ते नाही, गटारी नाही, पाण्याची पाईप लाईन लिकेजेस आहे, स्वच्छतेसाठी घंटागाड्या येत नाही, पाणी पुरवठा वेळेवर होत नाही,आरोग्या च्या सुविधा नाहीत,अस्वच्छता पसरलेली आहे,डेंगू ची साथ सुरू झाल्याने त्वरित सवछता करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. मनपा फंडातून, अल्पसंख्यांक निधीतून अथवा इतर निधीमधून वरील सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जळगाव शहरातील या अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये वरील निधीतून तसेच उपलब्ध असलेल्या इतर निधीमधून या वस्त्यांच्या नागरी सुविधा बाबत त्वरित कामे हातात घेण्यात यावी असे यात म्हटले आहे.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने जर आरोग्य संबंधित समस्या सोडवून खड्डे बुजवले नाहीतर आम्ही मनपा घरपट्टी अथवा इतर टॅक्स भरणार नाहीत व त्रिव स्वरूपाचे आंदोलन करू अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले.
यावल आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी सर्व बाबी ऐकून घेतल्या अर्धा तास चर्चा करून सर्व माहिती दिली व निश्‍चितच आपल्या या वस्त्यांमधील पाहणी करून अभियंता यांना आवश्यक त्या मनपा सुविधा त्वरित देण्याविषयी योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्‍वासन दिले.

Protected Content