तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विवाहास नकार देऊन धमकावल्याने शहरातील एका तरूणीने जीवनयात्रा संपविली होती. या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, नीलेश मंगलसिंग गायकवाड (रा. तारखेडा, ता. पाचोरा) याने दिव्या दिलीप जाधव (वय २१, रा. हरिओमनगर, कानळदा रोड) या तरूणीला विवाहाचे आमीष देऊन आपल्या जाळ्यात ओढले होते. मात्र यानंतर त्याने विवाह करण्यास नकार दिला. तिचे दुसरीकडे लग्न ठरले तरीदेखील नीलेश तिला त्रास देत होता. दुसरीकडे लग्न केले तर सोबतचे फोटो व्हायरल करुन लग्न मोडून टाकेल, अशी धमकी देत होता. या सततच्या जाचाला कंटाळून दिव्याने २४ जूनला गळफास घेतला होता. तिला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि, उपचार सुरू असताना १३ रोजी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी दिव्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी नीलेशविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Protected Content